अतिवृष्टीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी बैठक रद्द   

पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला बालेवाडीत साजरा होणार 

मुंबई  (प्रतिनिधी) : मागील तीन-चार दिवसांपासून कोसळणार्‍या पावसामुळे राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शेतकर्‍यांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची महत्त्वपूर्ण बैठक पुढे ढकलण्यात आली आहे असून, ३१ मे रोजी होणारी महिला पदाधिकार्‍यांचीही बैठकही रद्द करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. १० जून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन असून हा वर्धापन दिन पुण्याच्या बालेवाडी येथे साजरा केला जाणार आहे. त्यासाठी पुढच्या आठवड्यात नियोजन केले जाणार आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.
 
लोकसभेच्या दारुण पराभवानंतर विरोधकांमध्ये आलेले नैराश्य अजून दूर झालेले दिसत नाही. हवामान बदल लक्षात घेता पाऊस हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणात येतो आणि उर्वरित भागात तो उशिरा येतो. यावेळी मान्सून मे महिन्यात आला आणि तो जुलैसारखा मुसळधार पडतो तसाच तो महाराष्ट्रात कोसळत आहे. मे महिन्याच्या अखेरीस नालेसफाईची कामे सुरू असतात. मात्र, अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. निसर्गाचा प्रकोप होतो तेव्हा आपले हातसुध्दा अपुरे पडत असतात. काही कामात दिरंगाई झाली असेल तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत. ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. आणि त्या-त्या ठिकाणी सरकारकडून मदतकार्य सुरू आहे, असेही तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
 
महानगरपालिकांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्याव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यामुळे त्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत होऊ शकतात. अजून महायुतीच्या समितीमध्ये निवडणूक चर्चा झालेली नाही आणि अमित शहा यांच्याकडे तर खूप लांब आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या कुठून आल्या माहित नाही. महाराष्ट्रात आम्हाला महायुती म्हणून सोबत जायचे आहे. लोकसभा व विधानसभा एकत्रित लढलो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्या-त्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे. एकत्रित काम करणे अधोरेखित आहे; पण ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी महानगरपालिकानिहाय, जिल्हा परिषदनिहाय महायुतीची समन्वय समिती आहे ती बसून एकत्रितपणे चर्चा करु आणि ज्यावेळी जशी परिस्थिती त्यावेळी समन्वय समिती विचार करेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
 
शिरुर तालुक्यात १ मे ते २५ मेपर्यंत पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये) - टाकळी हाजी-९६.८,रांजणगाव गणपती-१११, मलठण-१११, शिरुर - १३६.२, कोरेगाव भीमा -१५२, वडगाव रासाई -१६२. ८, तळेगाव ढमढेरे - १९३.२, निमोणे -२७१.१, न्हावरा - २८५.५, पाबळ -२९८.
 

Related Articles